Sunday, July 18, 2010

माझे पोहणे

आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते..
खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण...

मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल... पाण्यात कायम मगर, सुसर आणि शार्क असतातच असं मला आपलं वाटायचं, आणि डोळे बंद करून पोहायचं म्हणजे संकटच....आला समजा शार्क नाहीतर मगर तर डोळे बंद केल्यावर कसं कळणार? आणि डोळे उघडे ठेवले तर डोळ्यात पाणी जाऊन डोळे चुरचुरतात त्यामुळे उगाच पोहायच्या भानगडीत पडले नाही कधी...माझ्या पोहायच्या विरुद्ध असायला जन्मदात्रीचे वेगळेच कारण होते...पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
खूप लहान असताना मांडवगणच्या गीतेच्या क्लासच्या सहलीला पंढरपूरला गेले होते तेव्हा चंद्रभागेत बरेच लोक उतरले, ते उतरले म्हणून मी पण...आणि ५ एक वर्षाची असतानाच विठ्ठलाला भेटायला जायची वेळ आली होती...तेव्हापासून मी देवापासून दोन हात लांबच राहते.

लग्न झाल्यावर नवऱ्याला एकदा हौसेने म्हंटल मला पोहायला शिकव तर याने मला पुलात नेलं आणि माझं डोकं पाण्यात दाबून धरलं...काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?

तर कालेजात पोहण्याचा क्लास होता तो करू का नको करत घेतला...नाव नोंदवायच्या आधी कोचला सांगितलं कि मी आत्तापर्यंत मुद्दामहून कधीही पाण्यात गेलेले नाही..
आता मुंबईत पावसाळ्यात आमच्या गल्लीत ५-५ फुट पाणी जमायचे आणि त्यातून मी अनेकदा गेले आहे हे तिला सांगायची गरज नव्हती म्हणून नाही सांगितलं ...आणि त्या
पाण्यात इतके लोक ये-जा करीत असतात कि बुडू म्हंटल तरी बुडायचे नाही...असो,

तर ब्याक टु माझं पोहणं...तर मी कोचला सांगितल्यावर ती म्हणाली हा क्लास बिगीनरसाठीच आहे...म्हंटल चांगलं आहे ...सगळे आपल्याचसारखे असतील त्यामुळे फजितीचा प्रश्न
फारसा नाही...पहिल्या दिवशी पहिले तर मी आणि अजून एक दोन मुलं सोडली तर बाकीचे लोक छान पोहत होते...मी पायरीजवळच्या पाण्यात उभी कारण त्यापुढे जायची हिम्मत होत नव्हती...पूल प्रचंड मोठा आहे...३ १/२ फुटापासून ८ फुटापर्यंत खोल आणि साधारण २५-३० फुट लांब एवढा मोठा आहे.. ४.५ फुटावर एक मोठा दोर मध्यावर बांधला
कोच आल्यावर आधी वॉर्मअप म्हणून पाण्यात धावायला लावले...त्याने अंगात उष्णता निर्माण होऊन पाणी तेवढे गार वाटत नाही...

मी कधीच २ फुटाच्या वर गेले नसल्याने आजूबाजूला लोक आहेत आणि कालेजवाले आपल्याला मरू देणार नाहीत हे जाणवल्याने मीसुद्धा पाण्यात धावायचा प्रयत्न केला....आणि साधारण ४.५ ते ५ फुटापर्यंत गेल्यावर  प्रचंड भीती वाटली आणि तोल जायला लागला...म्हंटल आता मी बुडणार...लगेच जवळच असणाऱ्याचा भसकन हात धरला आणि पाणी कमरेखाली आल्यावर गुपचूप कडेला जाऊन उभी राहिले....

माझी हि अवस्था पाहून थोडेसे बेसिक शिकवल्यावर बेल्ट लावायला दिला...मी बुडू नये म्हणून ...तर त्या बेल्टने मला काही पाय खाली ठेवता येईना आणि धड पोहताही येईना...एकदम त्रिशंकू होऊन गेले...दोनतीन वेळा तर ३.५ फुट खोल पाण्यातच गटांगळ्या खाल्ल्या...क्लास संपल्यावर दुसरा एक कोच जो थोड्या वरच्या लेवलला शिकवायचा त्याने काही टिप्स द्यायचा प्रयत्न केला...
" असं श्वास घेऊन खाली जायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा "
मी श्वास घेऊन खाली गेले आणि फुस्कन सगळा श्वास सोडला आणि भसकन पाणी नाका तोंडात...
"घरी बादलीत पाणी घेऊन त्यात सराव कर"
"बरं" असं सांगून केला नाही तो नाहीच... शेवटी विद्यार्थी असण्याचा पुरावा नको का?
आणि काय यड्यासारख बादलीत तोंड घालून बसायचं ...त्यापेक्षा पुलात बुडलेल परवडेल हासुद्धा एक विचार होताच...

सारखंसारखं बुडून वैताग आला शेवटी मी म्हंटल आता या बाईचं ऐकलं पाहिजे...म्हणतीये अंग सैल सोडून श्वास धरून डोक घाल पाण्याखाली तर घालावं....काही मरेपर्यंत बुडू द्यायची नाही...शेवटी तिचेही रेप्युटेशन आहेच नाही का?  थोडा श्वास धरून डोक घातलं पाण्याखाली आणि कसलासा फोमचा बोर्ड धरून पाय मारायला लागले ....काय आश्चर्य २ एक फुट तरी पोहता आले असेल...मग काय महाराजा !!!...भीती झाली ना कमी...मग एकदम जन्मजात कोळीण असल्यासारखं पोहायचा प्रयत्न करायला लागले...डोकं फार काळ पाण्याखाली ठेवायची हिम्मत अजूनही होत नव्हती पण बर्यापैकी बेल्ट न लावता जमायला लागलं...बऱ्याच जणांनी मी इतका मनापासून प्रयत्न करताना पाहून मदत केली, कौतुक केलं...आमच्या पोहायच्या बाईंनी तर दुसरा वर्ग चालू होईपर्यंत सराव करण्याची मुभा दिली...हळू हळू जमायला लागले आणि दोनचार स्ट्रोक सुद्धा जमायला लागले...

आता तर पाण्याची भीती बऱ्यापैकी कमी होऊन थोडफार पोहता येतं...काहीही झाले तरी पाय जमिनीवरच ठेवायचे हे मी लहानपणापासूनच ठरवले असल्याने इथेही उगाच फार खोल मी शिरत नाही आणि पाय जमिनीवर टेकतील इतपर्यंतच जाते...तरी हेही नसे थोडके.

Thursday, July 15, 2010

माझा एक थरारक अनुभव

मुंबईत असतानाकामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला..
खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते...

त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (सेकंडक्लासच्या) डब्यातून एक भरलेली गोणी धडपडली आणि
मग तिच्यावर गोष्टीतल्या उद्रांसार्ख समोरचा काही दिसत नसल्यासारख्या एकावर एक अजून गोण्या येऊन आदळल्या...आम्ही अर्थातच फिदीफिदी हसून घेतले...अजून एकदा मी गाडीत
चढताना अचानक कोणीतरी माझ्या पाठीत मारलं..मग मी संतापून दुसऱ्या एकीच्या पाठीत गुद्दा घातला...तिने पाहिलं आणि अजून मला मारायला धावली आणि मी पण प्रतिकाराच्या
पवित्र्यात उभी राहिले पण गाडी सोडायचा धोका आम्हाला असल्या फालतू कारणासाठी घ्यायचा नसल्याने ते तिथेच थांबलं...

असो, तर काय ? हं..माझा अनुभव ....झालं काय कि मी नेहमीप्रमाणे दादरात उतरायला म्हणून दारात उभी होते...
हि SSSSS गर्दी....तशातच गाडी थांबल्यावर मी उतरून घेतले पण....माझी पर्स कोणीतरी धरून ठेवली....इतर बायका मला धक्काबुक्की करून आत चढल्या आणि उतरल्या...मी आपली दारातच  एक हात दांड्याला धरून उभी...ती बाई काही पर्स सोडायला तयार नाही...तिला वाटलं असेल जीवाच्या भीतीने मी पर्स सोडून देईन...पण त्यात माझे त्यावेळेसचे २-३ हजार रुपये होते शिवाय बस पास ,ट्रेन पास अजून काही चिल्लर गोष्टी...तर मी काही पर्स सोडली नाही आणि तिनेपण ...लोकल चालू झाली ....मी पण एका हाताने दांडा धरून ठेवला आणि पळत पळत दुसऱ्या हाताने त्या बाईच्या हातावर गुद्दे मारायला सुरुवात केली...गाडीने वेग घेतला आणि मी पण...शेवटी तिने पर्स सोडली....

एवढं सगळं गर्दीने गजबजलेल्या दादरातल्या स्टेशनवर....ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना फलाटावर उभे असलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....हा प्रकार
झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले आणि इतरांसाठी काही झालेच नसल्याने तसाही काही वाटण्याचा प्रश्न आला नाही..

तर असा हा माझा एक अनुभव.

Recovery

Tuesday, June 8, 2010

मांडवगण

One of the Famous Turned trees
माझं गाव मांडवगण...जिल्हा - नगर... नगरमधल गाव म्हंटल्यावर दुष्काळी हे विशेषण आलंच...मला माझ्या लहानपणचं गाव आठवतंय...बर्यापैकी पाऊस पडत असे पावसाळ्यात...छान वाटायचं...अगदी हिरवळ वगैरेसुद्धा तयार व्हायची...अटाक्षा कटाक्षाला चांगले कंबरभर पाणी असायचे...मी तर पूर आलेलासुद्धा पहिला आहे...तर गावाबाहेर या नद्या...नदीच्या पलीकडे आमची शाळा...जमिनीवर बसायचं...अगदीच टोचतंय असं वाटलं तर पोतं न्यायचं...पण हे फक्त ३रि - ४थि पर्यंतच...नंतर बसायला बाक वगैरे असायचे...पास नापास सुद्धा अंगणात सगळ्या वर्गाना बसवून मग एक एक करत निकाल ऐकवले जायचे...अगदीच धोंडा असेल तर नापास व्हायचा नाहीतर शक्यतो सगळे पासच असायचे...पहिला - दुसरा नंबरसुद्धा सांगायच्या बाई...

शाळेत जाताना उजवीकडे गढीआईच मंदिर....हे एक प्राचीन मंदिर आहे...सगळं बांधकाम दगडी..मूर्तीसुद्धा प्राचीन...पण त्याची किंमत न समजल्यामुळे उपेक्षित...या गावाची आख्यायिका आहे...सांगते...प्राचीन काळी इथे मांडव ऋषी राहायचे...त्यांनी इथे बराच काळ घालवला...जेव्हा ते इथून पुढच्या जागी जायला निघाले तेव्हा कसलातरी आवाज आला म्हणून त्यांनी मागे वळून पहिले तर आजूबाजूच्या झाडांनी देखील मागे वळून पहिले आणि त्यांचे बुंधे तसेच राहिले...हि झाडे सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ बघायला मिळतात...तर या मांडव ऋषीच्या निवासाने पवित्र झालेला भाग म्हणजे मांडवगण...

सिद्धेश्वर मंदिर....हे सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे...जुने बांधकाम....मंदिराचा परिसर प्रचंड मोठा आहे...एका मोठ्या कमानीपासून आत समोरच एका भल्यामोठ्या हनुमानाच्या मूर्तीचे मंदिर आहे...इथून खाली चालले कि एक पावसाळ्यात वाहणारी म्हणून नदी म्हणायचे असा ओढा आहे...तो ओलांडून पुढे गेले कि २-३ मिनिट चालल्यावर अगदी हत्ती जातील अशा प्रचंड मोठ्या आणि रुंद पायऱ्या आहेत...त्या चढून सिद्धेश्वरला जायचे....मधेच एका उजव्या बाजूला मोठ्या वडाखाली मुसलमानाचा दर्गा आहे...पुढे चालत राहायचे....दोन्ही बाजूला मोकळी जागा...भन्नाट वारा
साथीला...मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या थोडेसे आधी उजव्या बाजूला एका छोट्या टेकडावर गंगेचे असे समजले जाणारे स्थान आहे....एका छोट्या दगडी खोलीत पायऱ्या उतरून गेले कि काळोखात खाली थोडेसे पाणी असते...वटवाघळे इथेच बघायला मिळतात...मंदिरात शिरताना एका मारुतीचे छोटेसे मंदिर आहे ....मारुतीला वंदन करून आत गेले कि .मोठीच्या मोठी दीपमाळ आपले स्वागत करते...आत जाताना आपल्याला एक बुटका आडवा दगडी खांब ओलांडून म्हणजे त्याखालून वाकून जावे लागते...देवासमोर नतमस्तक व्हायचे याची जाणीव करण्यासाठी असेल...सगळ्या भिंतीला लागून मोठेच्या मोठे उघड्यावरचे चौथरे आहेत....दीपमाळेच्या डाव्या बाजूने पायऱ्या उतरल्या कि मंदिराच्या मागच्या बाजूला जाता येते... सगळे बांधकाम दगडी आहे...खुद्द पिंडसुद्धा प्राचीन आहे...दीपमाळ ओलांडून गेले कि मोठा दरवाजा लागतो...जुना दरवाजा...त्यावर चौकोन चौकोन कोरून त्यामध्ये मोठमोठ्या कड्या लावलेल्या आहेत...तो ओलांडला कि लगेचच वरती मोठी घंटा आणि डाव्या आणि उजव्या बाजूला साधारण पाच साडेपाच फुट उंचीचे दगडी कट्टे...त्यावर नगारा ठेवलेला असे...आता बहुतेक नाही...रोज सकाळी हा नगारा वाजविण्यात यायचा...तसेच एका बाजूला एक मोठी तोफ आहे...कारण माहिती नाही...दारापासून ३-४ फुटांवर कासव...मग लगेच समोर एक छोटी दीपमाळ...नवीन बांधलेली असावी....त्याच्या उजवीकडे एक मोठी पण जुनी दीपमाळ...त्याभोवती कट्टा....त्यासमोरून वेगवेगळ्या छोट्या मंदिरांना सुरुवात होते...इथेही सगळे बांधकाम आणि मुर्त्या प्राचीन आहेत...मुख्य मंदिराच्या भोवती ५-७ वेगवेगळ्या देवी आणि देवतांची छोटी मंदिर आहेत....या दीपमाळेच्या समोरच्या मंदिरामागे एक यज्ञकुंड आहे...तिथे बरेचसे यज्ञ होतात...त्यापुढे थोडेसे गेले कि मोठ्ठा पिंपळ आहे आणि त्याखाली एक लहानसा नाला असा बांधलेला आहे....सिद्धेश्वरला आंघोळ घातली कि ते तीर्थ म्हणून येथे येते...थेंबभर तोंडात घ्यायचे....यज्ञवेदीच्या समोर १२ एक फुटांवर एक छानसे पांढऱ्या सुवासिक नरसाळ्याच्या आकाराच्या फुलांचे झाड आहे...त्याच्या फांद्या खूपच नाजूक असतात...झाडच नाव विसरले...

तर मुख्य मंदिरात आल्यानंतर जी छोटी दीपमाळ आहे तिच्यापासून लगेचच आतमध्ये मोठा थोरला नंदी पिंडीचे रक्षण करत बसलेला आहे....पोरांनी त्यावर सारखे चढू नये म्हणून बहुतेक त्याभोवती सळ्यांचा चौकोनी पिंजरा बांधलेला आहे....अर्थातच नंदी ४ एक फुट उंच चौथऱ्यावर आहे...या चौथऱ्यावर लोकांना ऐसपैस बसता येईल अशी भरपूर जागा आहे....इथून आत दोन्ही बाजूना लगेचच खांबांची रांग सुरु होते आणि प्रत्येक खांबावर एक मोठा आरसा आहे आणि वेगवेगळ्या देवांचे मोठे फोटो आहेत...गाभार्यात प्रवेश करण्याआधी परत एक दार ओलांडावे लागते...त्याच्या उजव्या बाजूला भिंतीत कोरलेला असा मारुती हातावर द्रोणागिरी घेऊन उडत आहे...गाभाऱ्यात जातानाचे दार ओलांडले कि आत अंधार असून दोन एक ठिकाणी समया आपला उजेड देत असतात...मध्यभागी एक मोठे काळया कुळकुळीत पाषाणाचे कासव आहे...हे सुद्धा प्राचीन काम....त्याला हळद कुंकू वाहून ७-८ फुट पुढे गेले कि गाभारा....एखादा दिवा तेवत असतो...पूर्ण शांतता...थंडगार वातावरण...फक्त पिंड आणि आपण...मनाला एकप्रकारची शांतता मिळते...म्हणजे मलातरी मिळते....या ठिकाणी आलं कि फक्त आहे तो क्षण याची आणि पिंडीची जाणीव असते...
तसेच उलट्या पावलांनी मागे यायचे कासवापर्यंत....आणि मग गाभार्यातून बाहेर...मन प्रसन्न होऊन जाते...

नंदीच्या डाव्या बाजूला मोठा १०-१२ फुट चौथरा बांधलेला आहे...कशासाठी काही माहिती नाही...त्यावर जायचे तर शिडी लावूनच जावे लागते....तर या मंदिराच्या चहुबाजूला एकसंध असे ४-५ फुट उंचीचे चौथरे आहेत जिथे निमित्ताने गाव जेवणे वगैरे कार्यक्रम होत असतात...किंवा असत म्हणावे लागेल...आताची परिस्थिती माहित नाही...यातील एका चौथार्यालाच भिंत वगैरे बांधून गुरवाची त्याच्या कुटुंबासहित राहायची सोय केलेली आहे....या मोठ्या चौथर्यापासून जरा उजवीकडे वळून थोडे पुढे गेले कि एक मोठे दार येते...या बाजूने बऱ्याच पायऱ्या खाली उतरल्यावर एक भले मोठे पाण्याचे कुंड लागते...ते बरेच खोल आहे आणि त्यातले पाणी कायम हिरवट असते...शेवाळ साचून साचून....याप्रकारच्या कुंडाला काहीतरी नाव आहे ते मी विसरले...बहुतेक बारव म्हणत असावेत...या कुणाच्या अलीकडेच एक गंगेची छोटी जागा आहे....असे म्हणतात कि तिथे गंगा येते...इथे जायला चिंचोळ्या पायऱ्या उतरून खाली जावे लागते...खाली एक छोटी खोली सारखे आहे तिथे कायम पाणी असते...पावसाळ्यात पाणी थोडे वर चढून पायरीपर्यंत येते....मला इथे जायला कायम भीती वाटते...तर या मागील भागात भरपूर चिंचेची झाडे आहेत...नेहमी इथे सावली असते...या मागच्या बाजूकडून गावाचा एक भाग ज्याला पेठ म्हणतात तिकडे जायचा रस्ता आहे....आजूबाजूला सगळे जंगल...वरती सांगितलेली मागे वळून पाहणारी झाडे देखील याच भागात आहेत....त्या झाडांजवळ अजून काही छोटी छोटी मंदिरे आहेत...इथेच हिंदू स्मशानभूमी आहे...कदाचित म्हणूनच अजून एक छोटेसे शिवाचे मंदिर आहे...

सिद्धेश्वर आणि हि झाडे आणि मंदिरे यामध्ये एक छोटी नदी वाहते...म्हणजे पावसाळ्यात तिथून पाणी वाहत असते...बाकी एरवी खडखडाट....गावच्या बायका इथे भांडी घासायला आणि धुणी धुवायला येतात.

तर असे हे माझे प्राचीन स्थळे मिरवणारे गाव....मांडवगण...दुर्लक्ष आणि प्राचीन वस्तू आणि ठिकाणाबद्दलच्या अनास्थेमुळे कोणालाही दखल न घ्यावेसे वाटलेले गाव...पण आता असे ऐकून आहे कि एका मोठ्या बिल्डरने इथे बांधकाम सुरु केले आहे...कदाचित जग जवळ आल्यामुळे प्राचीन मंदिरे जतन करण्याची आणि त्यापेक्षाही कॅश करण्याची जागरूकता आली असेल....मध्ये ४-५ वर्षापूर्वी गावाच्या नव्या नेतृत्वाने म्हणे गाभार्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतून मंदिर विरूप केले....गावातील प्रतिष्ठित मंडळीनी आक्षेप घेऊन ते थांबविले....तर तुम्हाला जमेल तेव्हा इथे भेट जरूर द्या....खात्रीने सांगते कि तुम्हाला पश्चाताप होणार नाही...अहमदनगरपासून साधारण ४५मि. ते एक तासाच्या अंतरावर हे गाव आहे....नगरलाच रहा...इथे गैरसोय होईल.

backyard of the Siddheshwar

dipmal


side wall of the Gabhara entrance



one of the small mandir in Siddheshwar

Thursday, June 3, 2010

...आणि म्हातारीच्या अंगावर सायकल गेली (चुकून )

मला लहानपणापासूनच सायकलची भारी हौस..चालण्याऐवजी सायकल आवडायची...लहानपण गावातच गेलं त्यामुळे स्पेशल लहान मुलांची सायकल वगैरे काही फालतू लाड नसायचे...जी मिळेल ती घ्यायची...मोठी सायकल त्याच्या दांड्याच्या मधून पाय टाकून एक चालवायला लागायची...जड बुदुक सायकल खुपदा पेलायची नाही आणि मी खाली आणि सायकल वर असा प्रकार व्हायचा...पण हौस काही फिटली नाही...अजूनही...

गावाला सायकल चालवताना फार्फार गोष्टींचे भान ठेवायला लागायचे...तुम्हाला वाटेल गावात काय खूप रहदारी नसते त्यामुळे किती सोपंय सायकल चालवणं...पण ते काही खरं नाही..धुळीचा रस्ता आणि त्याभोवती बऱ्याचदा येड्या बाभळीचे काटे (खरं तर हे काटे मेले सगळीचकडे असायचे) , गाय, बैल, म्हशी आणि देवाला सोडलेला वळू ( याला काहीतरी नाव आहे ते विसरले) ...भटके कुत्रे बोनुस...याशिवाय अधेमध्ये रस्ता सोडून पळणारे पोरं आणि चालणारे  बाया...जरा धक्का लागली कि निघालीच तुमची आय-माय....

अशातच एकदा मी ६-८ वर्षाची असताना सायकल खेळत होते आणि जवळच्या घराच्या पारावर असलेल्या येड्या बाभळीच्या सरपणावर पडले...माझी लहान बहिण आणि तिच्याच वयाची मामाची मुलगी या दोघी जवळच खेळत होत्या...मी पडले हे पाहून या भवान्या जवळ आल्या आणि त्यांना "मला काट्यातून बाहेर यायला मदत कर...हे काटे बाजूला घे" सांगितले ....मदत दूरच पण या दोघी फिदीफिदी हसायला लागल्या...मला इतका राग आला...मग मी कशीतरी त्या काट्यातून बाहेर आले आणि या दोघींना फटकावले...लागल्या लगेच जोरजोरात भोकाड पसरायला...ते ऐकून माझी आई बाहेर आली आणि मी काट्यात पडले, मला लागलं हे काही न बघता मला धपाटा घातला...आणि मी काट्यात पडल्याचे सांगितले तर ती पण हसायला लागली...दुष्ट आहेत सगळे...

हां...तर काय सांगत होते मी ? म्हातारीच्या अंगावर सायकल कशी गेली...तर आम्ही पुण्याला मामाकडे गेलो होतो एका सुट्टीत...त्यावेळी मी काहीतरी १० एक वर्षाची असेन...तिथेही सायकल खेळायचे चालू होते...मामा ज्या ठिकाणी राहत होता त्या गल्लीचा रस्ता सरळसोट नव्हता तर मध्येमध्ये मोठे दगड, उंचवटे इ. सायकल चालावण्यासाठीच्या दृष्टीने लहान मुलांसाठी एक साहसी रस्ता होता...ते च्यालेंज घेऊन मी दिवसभर भिरीभिरी सायकल खेळायचे...एकदोनदा म्हशींच्या गोठयातच घुसणार होते...असो..

तर इतरही अशा सायकल खेळणाऱ्या पोरी होत्या त्यांच्याबरोबर मैत्री झाली... एका सकाळी छान उन पडले होते आणि आवरून मी सायकल खेळायला बाहेर पडले...म्हशींच्या गोठ्यापासून थोडे पुढे गेल्यावर एका मैत्रिणीची हाक ऐकू आली...ती मला तिच्याकडचे एक पुस्तक वाचायला देणार होती...मी आपली वर बघून तिच्याशी बोलत सायकल चालवत होते...तिच्या घराच्या समोर एक स्कूटर उभी होती....पाय ठेवतो त्या जागी एक आजीबाई बसल्या होत्या...बऱ्याच म्हाताऱ्या होत्या...मामीने नंतर सांगितले कि त्यांचे वय ९० वर्षे आहे....तर वर बघून सायकल चालवताना समोर लक्ष राहत नाही हे त्या दिवशी कळले...आणि त्याचबरोबर आपल्याला अजून सायकल नीट चालवता येत नाही हाही साक्षात्कार झाला...तोल गेला आणि मी स्कूटरवर आपटले...त्याबरोबर आजीबाई पडल्या....मग एकाच गोंधळ....त्यांच्या घरातला एक माणूस आला आणि मला बोलायला लागला...माझी सायकल अडवून धरली ....मी १० एक वर्षाचीच होते त्यामुळे अक्कल नव्हती...मी चुकले मला कळले पण त्या माणसाचा राग आला होता....आणि माफी मागण्या ऐवजी मी वाद घालायला लागले...मग आमच्या घरापर्यंत बातमी गेली आणि मामी आणि आई आली आणि लोकांची समजूत घातली....आजींची चौकशी केली...फार काही झाले नव्हते पण त्यांचे वय बघता काळजी घेणे जरुरी होते...

मग मी त्या आजींना sorry म्हणून आले आणि सायकल घेऊन घरी आलो.........मग पुन्हा काही सायकलला हात लावू दिला नाही...नंतर पुन्हा कधी मामाकडे गेलो कि त्या घटनेची आठवण यायची...

डॉक्टरीणबाई

मागच्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो...माझे आई वडील पनवेलात राहत होते...नवऱ्याचे CBD त ....मी पनवेलात गेले होते २ दिवसासाठी...दुसर्या दिवशी दुपारी माझ्या लेकीची शी धुवायला गेल्यावर माझ्या आईला दिसले कि किंचित लालसर आहे...कदाचित रक्त असेल म्हणून ताबडतोब डॉक्टरकडे जावे...मला काही एवढे विशेष आहे असे वाटले नाही पण आईने खूपच जोर केला म्हणून जवळच्याच क्लिनिक मध्ये जिथे बालरोगतद्न्य असते इथे गेलो...गेल्यावर कळले कि त्या इथे येत नाहीत...मग त्यांच्या क्लिनिक मध्ये गेलो...

क्लिनिक मध्ये गेल्यावर थोडा वेळाने बाई आल्या आणि तपासले...विचारले काही वेगळे खाल्ले पिल्ले का? "नाही, पण हे लोक हल्लीच भारतात आले अमेरिकेतून आणि बाळाची पहिलीच visit आहे ", माझी आई...मग मला विचारले तुम्ही बाळाच्या कोण ,"आई"...बरं...बाळाला gastro वाटतोय,admit करावे लागेल...फारसे सिरीयस नाही पण काहीही होऊ शकते...निर्णय तुमचा...मी घाबरले...नवर्याला फोन करून विचारले. आता फोनवर त्याला डॉक्टर admit कर म्हणतेय सांगितल्यावर तो होच म्हणणार...तर admit केले...त्याआधी private रूमचा भाव सांगून general पेक्षा बरे म्हणून रूम घेतली... हाताला सलाईन वगैरे लावले...मग नवरा आला..थोड्या वेळाने इतर लोकांशी बोलले तर कळले कि सगळ्यांना gastro साठीच admit केले आहे....बांर...

दुसर्या दिवशी डॉक्टरीणबाई आल्या आणि मला सांगायला लागल्या कि त्यांची वन्स अमेरिकेत आहे....त्यांना पण कसे अमेरिकेत जायला मिळत होते...पण नवर्याला तिथे operation करायला नाकारले म्हणून नवर्याने इथेच राहायचे ठरवले....नाहीतर कश्या त्या पण आत्ता अमेरिकेत असत्या...वगैरे...मला काही त्यांचा रंग ठीक वाटलं नाही...म्हणून बाळाला बरे वाटल्यावर लगेच discharge घ्यायचे ठरवले...डॉक्टर नाहीच म्हणत होत्या....पण विशेष काही नव्हते आणि gastro पण नव्हता मग कशाला ठेवायचे आणि CBD ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊया म्हणून discharge घेतला...
बिल आले....अक्षरशः अव्वाच्या सव्वा बिल लावले होते...आम्ही विचारायला गेलो..नवरा नकोच म्हणत होता...पण मी आग्रह केला...डॉक्टरीणबाई काय म्हणाली असेल? " तुम्ही अमेरिकेत राहता...तिथे किती बिल होते मला माहिती आहे...तिथल्यापेक्षा हे कमीच आहे...तुम्हाला काही हे जड नाही."

"आम्ही तुम्हाला द्यायला पैशे कमवीत नाही...तुम्ही इथल्याप्रमाणे बिल लावा." काही charges अव्वाच सव्वा होते ते सांगितले...तर त्या म्हणे कि मी तुम्हाला इतर बिल दाखवते...मी म्हंटल दाखवा...तर आम्ही तिथेच उभे आणि हि बाई खाली मान घालून काहीच बोलेना...म्हंटल हि काही दाखवणार नाही इतर बिल...
शेवटी आम्ही बाहेर आलो...मी नवर्याला म्हंटले हजारभर रुपये कमीच देऊ...उघडपणे ती बाई आपल्याला लुबाडतेय....हा पुळचट....काही नको..सगळे पैसे भर...अमुक तमुक...शेवटी मी वैतागले....पैसे काही मी कमवीत नाही...खड्ड्यात जा...माझ्याकडचे १०० रुपय काही दिले नाही..त्याने काय फरक पडनार...पण माझ्या मनाचे समाधान...

काही दिवसांनी तिथल्या सरकारी शाळेच्या कुंपणावर याच बाईची जाहिरात वाचली " फुकट तपासणी शिबीर. लहान मुलाची फुकट शारीरिक तपासणी करून घ्या. डॉ. स्वाती लिखिते".

बरोबर आहे...तपासणी फुकट आणि मग काहीतरी सांगून admit करायला सांगायचे. चांगला धंदा आहे.

Saturday, March 13, 2010

communication

I don't like to have a crowd around me.....well, this is not the right sentence to start with but....anyways, I like to be in contact with few people that I feel comfortable with.....but not always....sometimes I don't even take phone calls or don't feel like talking with them....try to call them when I am able to leave the message instead of talking with them...

it's not that I hate to be with people but certainly can't be with them at all the time.....hate to talk shit with the parlor lady.....don't like to go out shopping with other gals, I have to compromise with my plan....not that I usually has any....

May be I am aloner.....like to enjoy things with myself.....may be because at younger age I had girl friends who acted jealous because of all the attention I use to get....few times my so called friends stood me up....anyways,

Recently I joined couple of clubs and been to one's meeting.....Indians.....very noisy and loud meeting.....didn't even get to meet or got to know other gals....so what's the point? May be two- three gals with kids chatting and sharing things will work for me....

Lot of times I find myself opening email a/cs for no reason for many times during the day.....to tell the truth, everyday.....log in to orkut..... invisible....even if I see someone available I hardly chat....but do leave the scrap....I am not sure why I do this? Obviously I need to have some conversation......that's why I am writing this blog!!!......still can't take or should I say don't take initiative to speak with other people.....

Don't know how to end this article.....

Tuesday, March 2, 2010

Well...

I try to think about funny and crazy things happened to me that I want to write but when I start for some reason I can't think anything but people who hurt me in so many ways....friends, co-worker, family and so on...

Why is that? I don't wanna write about people and events which didn't make me happy or didn't make me laugh....rather they hurt me, many times deliberately...but still I can't forget them....I don't want you guys to read some boring story which might not make you laugh....What can I do to forget these shitty people and events in my life?

Just saying forget it doesn't work...does it? well....anyways...I will keep trying...