Friday, November 4, 2011

नटरंग

मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का??
मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले?

अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला. म्हंटल काही हरकत नाही, काय होईल फार फार तर १०० रु. वाया जातील...अगदी नवी कल्पना, मस्त अभिनय ..मला खूप आवडला "वळू". मग हळू हळू बरीच नवीन नावं ऐकू यायला लागली रात्र आरंभ, गाभ्रीचा पाऊस, हल्लीच देऊळ त्यातच एक नाव होते नटरंग. विषय वाचला "तमाशा", आधी वटला काय असणार नवीन ? फार फार तर गाणी आणि सजावट. पण विषय बराच वेगळा आहे. कथा, अभिनय अन गाणी सगळेच अप्रतिम. एकाच उणीव ती म्हणजे गावठी हेल काढून बोलणे, गावठी स्क्रिप्ट लिहिणे तितकेसे जमत नाही.

सुरुवात होते एका पुरस्कार समारंभाने ज्यात गुणा आपले मुख्य पात्र याला जीवनगौरव पुरस्कार मिळतो. हा एक बायका -पोरं अन म्हातारा बाप असलेला सामान्य शेतमजूर ज्याला तमाशाची आवड / नाद असतो. त्याच्या शेतमालकाने नवीन साधनं आणल्याने त्याची मजुरी सुटते. हा गुणा वाग लिहिण्यात हुशार असतो अन त्याला त्याची खूप आवडही असते. त्याच्यासारख्याच मजुरांना घेऊन तो तमाशाचा फड उभा करू लागतो...त्याचा म्हातारा बाप त्याच्या विरोधात असतो..सासरासुद्धा येतो कि " हवं तर मी तुम्हाला नवीन धंदा उघडून देतो पण तमाशा नको"...गुणा त्याच्या निश्चयावर ठाम असतो. धडपड करून एक एक करत सगळे जमत आलेले असते पण तमाशा म्हंटल्यावर बाई हवीच...तीसुद्धा चांगली नाचणारी, दिसणारी अन गाणारीसुद्धा...ते कसं जमायचं? जमवतात कसंतरी...
बरीच धावपळ केल्यावर अन मार खाल्ल्यावर एक तमासगीर मुलगी अन तिची आई तयार होतात पण एका अटीवर "तमाशात नाच्या हवा त्याशिवाय नाचणार नाही". आली का पंचाईत!! इथे सगळे "मर्द" तर नाच्या कोण होणार? सगळं फिसकटतय का काय अशी परिस्थिती येते...शेवटी आपला गुणा तयार होतो.

मुख्य नाचणारी त्याला स्त्रीचे हावभाव, चालणे, बोलणे, मुराकणे शिकवते अन एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. दोन फड लावल्यानंतर लगेच त्यांना सुपाऱ्या मिळायला लागतात...लोकांना फड खूप आवडलेला असतो. इकडे गावातील लोक त्याच्या बायकोला नक्को जीव करून सोडतात...बायका टोमणे मारतात, पुरुष तिचा गैरफायदा घ्यायला बघतात अन लोक त्याच्या मुलाला त्रास देऊ लागतात..काहीबाही बोलू लागतात. खुद्द त्यालासुद्धा त्याच्याच तमाशात नवीन आलेल्या ढोलकीवाल्याकडून अंगचटीला जाणे अन शारीरिक सुखाची मागणी याला सामोरे जावे लागते.

दौर्यावर असताना दोन राजकीय गटांमधील सुंदोपसुन्दीत त्याच्या थेटरला आग लावली जाते अन त्याच्यावर बलात्कार होतो. सगळं उन्मळून पडल्यावर तो घराकडे जातो तर घर बंद असते...बायको मुलांसाठी सासरी जातो तर त्याची छी थू करून हाकलला जातो...अगदी त्याच्या मुलाकडूनसुद्धा. आता त्यांना तरी कसा दोष देणार? परत आल्यावर कोणताही साथीदार नवीन सुरुवात करायला तयार होत नाही, एक सोडून ..त्याची नर्तकी. ती त्याची साथ देते अन शेवटी जीवनगौरवपुरस्कारापाशी येऊन सिनेमा थांबतो.

Sunday, October 23, 2011

हे ssssss इथं

आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे".
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही....बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक "हे इथच " असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला....तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने "कुठं ?" विचारल्यावर ह्याने "हे ssss इथं " सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं...

अजून एक किस्सा आठवला...पुण्यातला..
मी पुणे university त एका कामासाठी गेले होते आणि हवा तो विभाग कुठे आहे ते माहिती नसल्याने म्हंटल जरा विचारून सापडेल...तर एका इमारतीत गेले आणि एका प्यूनला विचारला...त्याने हि पुढची इमारत असं सांगितल्यावर "त्या पुढच्या " इमारतीत गेले आणि पार अगदी तिसऱ्या मजल्यावर जाऊनसुद्धा कोणी कुत्रासुद्धा, माफ करा कुत्रे तिथं बरेच होते तेव्हा कोणीच माणूस सापडेना..म्हणून तसेच फिरत फिरत हि नाही ती असेल करीत आजूबाजूच्या इमारतीत गेले...त्यातल्याच एका ऑफिसातल्या बाईंनी एका इमारतीत जा सांगितले आणि कसं जायचं (म्हणजे इथून उजवीकडे मग डावीकडे )ते सांगितलं....मग तसं गेले...तर तिसऱ्याच ठिकाणी...शेवटी वैतागून म्हंटल एखाद्या विद्यार्थ्याला नाहीतर रस्त्यावरच्या कोणालातरी विचारावं आणि एक महाशय जे शिक्षक असू शकतात हि शंका आली त्यांना विचारलं...त्यांनी काही प्रश्न विचारून मला हवा तो विभाग कोणता आणि इथे कसं जायचं ते सांगितलं....इथे गेले...

जरा आत गेल्यावर लक्षात आलं कि पहिल्यांदा ज्या ठिकाणी (जिथून प्युनने "हि पुढची" सांगितलं ) तिथंच स्वारी परत आलेली. इतका संताप आला आणि मग हसू आलं. त्या प्युनला झापावं तर तो मेला कुठं दिसेना. तो विभाग तळात होता. मग तिथल्या एका ऑफिसात जाऊन एका तरुण प्रोफेसरला भेटले आणि काम सांगितलं. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अजून एका ठिकाणी जायला सांगितलं. मी पत्ता विचारला तर इमारतीचं नाव देऊन महाशय म्हंटले कि "हि इथेच ए". मग मात्र राहवलं नाही..." अहो काय लावलंय? इथ यायच्या आधी याच ठिकाणच्या एका प्युनने ती पुढची बिल्डींग म्हणून इथून पाठवलं. प्रत्येकजण हि इथंच ए करत होते आणि याच इमारतीभोवती गेला दीड एक तास तरी मी गोल गोल फिरतेय...जरा नीट सापडेल असं पत्ता सांगायला काय होतंय? " असं वसकले.

असो,
पण एकंदरीत एखाद्याला आपला पत्ता सांगायचा नसेल किंवा घरी सहजासहजी किंवा अगदीच घरी येऊ द्यायचं नसेल तर बिनदिक्कत सांगावे "अरे त्यात काय मी हे sssssss इथच तर राहते/तो " ,
त्याने शंका काढली कि "कसं यायचं?" तर जसं काही आपण अमिताभ बच्चनसारखे अगदी प्रसिद्ध आहोत असं भासवून
"अमुक अमुक स्टेशनावर ये आणि खाली उतरून कोणालाही विचार" किंवा " अमुक अमुक बस स्टॉपवर उतर आणि कोणालाही विचार ",


आणि जर आपल्याला कोणी अशा पद्धतीचा पत्ता सांगितला तर समजावे की कोणालाच तो माणूस किंवा पत्ता माहिती नाही...अन आपली भरपूर पायपीट होणार आहे....इतके करूनही नशीब जोरावर असेल तरच पत्ता सापडेल ...त्यामुळे असा कोणी पत्ता सांगत असेल तर त्यांनाच घरी बोलवावे आणि म्हणावे "एक फोन टाक, मी स्टेशनावर घ्यायला येते/तो" आणि एकदम घाई असल्याचे किंवा बस आल्याचे किंवा अचानक कोणीतरी ओळखीचे पण खूप काळ न भेटलेले दिसले असे करावे आणि जरी आपल्याकडे त्या ह्या ओरिजिनल वेळखाऊचा फोन नंबर नसला तरी " मी तुला फोन करतो/ते, आता खूप घाईत आहे " वगैरे सांगून पळावे.


Saturday, October 15, 2011

Purpose

I don't know what the fukin' purpose of my life is!!! So damn difficult. 

Honestly, I love my child but she is not gonna need me when she grows up. Then what? May be learning new stuff, singing, dancing, going places...may be the world trip. Not the traditional like going to place to take a picture and move on but to stay and enjoy and what not...but then what?  What have I changed? Who the hell needs me? If they do, why? Did I make their life happy? Made any difference?  

Sometimes, I look in the mirror and can't figure out who that is? What's the relation? Do I know her? What is happening? 

 What kind of life is that which doesn't make any difference!! In a good way. What is good way anyways? Who decided what's good and what's bad? If that's fair then why the hell people who make other people's life miserable are not punished? 

I don't know anymore. Feels like I am wasting my life here. So I am giving my time to help at school. I am so tired...physically, mentally ..don't feel like talking to anyone for no reason. I use to feel happy even when the time was harsh...not just harsh but fucked up..now it's all fine...Then why the hell do I feel this crappy? Not sure what I wanna do and even if I do that I will be happy.




Wednesday, February 9, 2011

बोबडी

सगळे तिला बोबडीच म्हणायचे....अर्थात तिच्या समोर नाही...
मी तिला पहिल्यांदा कधी पहिले ते आठवत नाही... मी साधारण ४-६ वर्षाची असताना आज्जी मला मुंबईला घेऊन जायची, तेव्हा असेल कदाचित...ती आजीची मैत्रीणच होती म्हणा ना!! आईच्या म्हणण्यानुसार ती माझ्या पणजीला कुठे पीठ आणून दे, कुठे किराणा आणून दे वगैरे फुटकळ कामे करी...
साधारण आजीच्याच वयाची असेल...नेहमी घरी यायची...घर म्हणजे तरी काय...फक्त एक छोटी खोली...तीच बेडरूम, लिविंग रूम, किचन...चाळीतल्या खोल्या अजून कशा असायच्यात!! 

गिरगावात राहायचो आम्ही त्यावेळेस...नेमकी चहाची वेळ साधून बोबडी नेहमी घरी यायची......त्यावेळेस आमचीच पंचाईत असायची...मग तिला चहाचा एक कप दिला जायचा...कदाचित तेव्हढ्यासाठी ती "ती " वेळ साधून येत असावी...मग आम्ही हळूच बिस्कीट कपात टाकायचो...तिला दिसू नये म्हणून...मग तसाच चहा प्यायचा....

एकदा काही कारणाने मी तिच्या घरी गेले...घरी एक जाऊ होती जी ऑर्डरनुसार चकल्या, लाडू वगैरे वगैरे बनवायची....हाताला खूप चव होती तिच्या...बर्यापाकी ऑर्डरी मिळायच्या...घर चालवायची....त्या उलट बोबडी...उपजीविकेची साधन म्हणजे नवरा...तो काय करायचा काय माहित....तिचे घरसुद्धा आमच्यासारखेच....अजून कसे असायचेय!!! तिच्या घरी अर्थातच तिच्या मताला काही किंमत नाही...मला फार वाईट वाटायचे...पण काय करणार? जगाचा नियम...

मी गावातून मुंबईत आले तेव्हा माझ्यासाठी शाळा शोधणे चालू होते....आमच्या घरमालकांनी आम्ही अगदीच दरिद्री आहोत असे वाटून मुन्सिपाल्तीची शाळा सुचवली, पण बोबडीने डी.जी.टी. शाळेबद्दल सांगितले आणि मी बर्यापिकी शाळेत गेले...मध्यमवर्गीयांची शाळा...चांगली होती..अजूनही आहे, पण कशी ते माहिती नाही..

काही काळाने आम्ही ते घर सोडून उपनगरात आलो...बोबडीचा विसर पडला...अशातच ती एकदा आली...दार उघडल्याबरोबर माझ्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली...लगेच संशय आला कि काहीतरी ठीक नाही...आणि तिने सांगितलेच...वाईट वाटले...आता जावेच्याच जीवेवर जगणे आले..ती काही खूप वाईट होती अश्यातला भाग नाही, पण तरीही...

कसे असते ना आयुष्य? आता कदाचित नसेलही ती...सॉरी..त्या आजी...


Friday, December 17, 2010

खूब लडी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी

सुभद्राकुमारी चौहान यांची राणीवर केलेली कविता...राणी म्हणजे झाशीची राणीच...जसे महाराज म्हंटल्यावर शिवबा आठवतात तसे राणी म्हंटले कि झाशीचीच...दुसरी होती का कोणी?


सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी,
नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी,
बरछी, ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी।
वीर शिवाजी की गाथायें उसको याद ज़बानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार,
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,
नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार,
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़|
महाराष्ट्र-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।
हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में,
ब्याह हुआ रानी बन आई लक्ष्मीबाई झाँसी में,
राजमहल में बजी बधाई खुशियाँ छाई झाँसी में,
सुघट बुंदेलों की विरुदावलि-सी वह आयी थी झांसी में,
चित्रा ने अर्जुन को पाया, शिव को मिली भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजियाली छाई,
किंतु कालगति चुपके-चुपके काली घटा घेर लाई,
तीर चलाने वाले कर में उसे चूड़ियाँ कब भाई,
रानी विधवा हुई, हाय! विधि को भी नहीं दया आई।
निसंतान मरे राजाजी रानी शोक-समानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया,
राज्य हड़प करने का उसने यह अच्छा अवसर पाया,
फ़ौरन फौजें भेज दुर्ग पर अपना झंडा फहराया,
लावारिस का वारिस बनकर ब्रिटिश राज्य झाँसी आया।
अश्रुपूर्ण रानी ने देखा झाँसी हुई बिरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

अनुनय विनय नहीं सुनती है, विकट शासकों की माया,
व्यापारी बन दया चाहता था जब यह भारत आया,
डलहौज़ी ने पैर पसारे, अब तो पलट गई काया,
राजाओं नव्वाबों को भी उसने पैरों ठुकराया।
रानी दासी बनी, बनी यह दासी अब महरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

छिनी राजधानी दिल्ली की, लखनऊ छीना बातों-बात,
कैद पेशवा था बिठूर में, हुआ नागपुर का भी घात,
उदैपुर, तंजौर, सतारा,कर्नाटक की कौन बिसात?
जब कि सिंध, पंजाब ब्रह्म पर अभी हुआ था वज्र-निपात।
 बंगाले, मद्रास आदि की भी तो वही कहानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी रोयीं रनिवासों में, बेगम ग़म से थीं बेज़ार,
उनके गहने कपड़े बिकते थे कलकत्ते के बाज़ार,
सरे आम नीलाम छापते थे अंग्रेज़ों के अखबार,
'नागपुर के ज़ेवर ले लो लखनऊ के लो नौलख हार'।
यों परदे की इज़्ज़त परदेशी के हाथ बिकानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

कुटियों में भी विषम वेदना, महलों में आहत अपमान,
वीर सैनिकों के मन में था अपने पुरखों का अभिमान,
नाना धुंधूपंत पेशवा जुटा रहा था सब सामान,
बहिन छबीली ने रण-चण्डी का कर दिया प्रकट आहवान।

हुआ यज्ञ प्रारम्भ उन्हें तो सोई ज्योति जगानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी,
यह स्वतंत्रता की चिनगारी अंतरतम से आई थी,
झाँसी चेती, दिल्ली चेती, लखनऊ लपटें छाई थी,
मेरठ, कानपुर,पटना ने भारी धूम मचाई थी,
जबलपुर, कोल्हापुर में भी कुछ हलचल उकसानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

इस स्वतंत्रता महायज्ञ में कई वीरवर आए काम,
नाना धुंधूपंत, ताँतिया, चतुर अज़ीमुल्ला सरनाम,
अहमदशाह मौलवी, ठाकुर कुँवरसिंह सैनिक अभिराम,
भारत के इतिहास गगन में अमर रहेंगे जिनके नाम।
 लेकिन आज जुर्म कहलाती उनकी जो कुरबानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

इनकी गाथा छोड़, चले हम झाँसी के मैदानों में,
जहाँ खड़ी है लक्ष्मीबाई मर्द बनी मर्दानों में,
लेफ्टिनेंट वाकर आ पहुँचा, आगे बढ़ा जवानों में,
रानी ने तलवार खींच ली, हुया द्वंद असमानों में।
ज़ख्मी होकर वाकर भागा, उसे अजब हैरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार,
घोड़ा थक कर गिरा भूमि पर गया स्वर्ग तत्काल सिधार,
यमुना तट पर अंग्रेज़ों ने फिर खाई रानी से हार,
विजयी रानी आगे चल दी, किया ग्वालियर पर अधिकार।
अंग्रेज़ों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

विजय मिली, पर अंग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी,
अबके जनरल स्मिथ सम्मुख था, उसने मुहँ की खाई थी,
काना और मंदरा सखियाँ रानी के संग आई थी,
युद्ध श्रेत्र में उन दोनों ने भारी मार मचाई थी।
पर पीछे ह्यूरोज़ आ गया, हाय! घिरी अब रानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

तो भी रानी मार काट कर चलती बनी सैन्य के पार,
किन्तु सामने नाला आया, था वह संकट विषम अपार,
घोड़ा अड़ा, नया घोड़ा था, इतने में आ गये सवार,
रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार-पर-वार।
घायल होकर गिरी सिंहनी उसे वीर गति पानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी,
मिला तेज से तेज, तेज की वह सच्ची अधिकारी थी,
अभी उम्र कुल तेइस की थी, मनुज नहीं अवतारी थी,
हमको जीवित करने आयी बन स्वतंत्रता-नारी थी,
दिखा गई पथ, सिखा गई हमको जो सीख सिखानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी,
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनासी,
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी,
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी।
तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

त्या रणचंडिकेला प्रणाम.
 

Sunday, July 18, 2010

माझे पोहणे

आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते..
खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण...

मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल... पाण्यात कायम मगर, सुसर आणि शार्क असतातच असं मला आपलं वाटायचं, आणि डोळे बंद करून पोहायचं म्हणजे संकटच....आला समजा शार्क नाहीतर मगर तर डोळे बंद केल्यावर कसं कळणार? आणि डोळे उघडे ठेवले तर डोळ्यात पाणी जाऊन डोळे चुरचुरतात त्यामुळे उगाच पोहायच्या भानगडीत पडले नाही कधी...माझ्या पोहायच्या विरुद्ध असायला जन्मदात्रीचे वेगळेच कारण होते...पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
खूप लहान असताना मांडवगणच्या गीतेच्या क्लासच्या सहलीला पंढरपूरला गेले होते तेव्हा चंद्रभागेत बरेच लोक उतरले, ते उतरले म्हणून मी पण...आणि ५ एक वर्षाची असतानाच विठ्ठलाला भेटायला जायची वेळ आली होती...तेव्हापासून मी देवापासून दोन हात लांबच राहते.

लग्न झाल्यावर नवऱ्याला एकदा हौसेने म्हंटल मला पोहायला शिकव तर याने मला पुलात नेलं आणि माझं डोकं पाण्यात दाबून धरलं...काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?

तर कालेजात पोहण्याचा क्लास होता तो करू का नको करत घेतला...नाव नोंदवायच्या आधी कोचला सांगितलं कि मी आत्तापर्यंत मुद्दामहून कधीही पाण्यात गेलेले नाही..
आता मुंबईत पावसाळ्यात आमच्या गल्लीत ५-५ फुट पाणी जमायचे आणि त्यातून मी अनेकदा गेले आहे हे तिला सांगायची गरज नव्हती म्हणून नाही सांगितलं ...आणि त्या
पाण्यात इतके लोक ये-जा करीत असतात कि बुडू म्हंटल तरी बुडायचे नाही...असो,

तर ब्याक टु माझं पोहणं...तर मी कोचला सांगितल्यावर ती म्हणाली हा क्लास बिगीनरसाठीच आहे...म्हंटल चांगलं आहे ...सगळे आपल्याचसारखे असतील त्यामुळे फजितीचा प्रश्न
फारसा नाही...पहिल्या दिवशी पहिले तर मी आणि अजून एक दोन मुलं सोडली तर बाकीचे लोक छान पोहत होते...मी पायरीजवळच्या पाण्यात उभी कारण त्यापुढे जायची हिम्मत होत नव्हती...पूल प्रचंड मोठा आहे...३ १/२ फुटापासून ८ फुटापर्यंत खोल आणि साधारण २५-३० फुट लांब एवढा मोठा आहे.. ४.५ फुटावर एक मोठा दोर मध्यावर बांधला
कोच आल्यावर आधी वॉर्मअप म्हणून पाण्यात धावायला लावले...त्याने अंगात उष्णता निर्माण होऊन पाणी तेवढे गार वाटत नाही...

मी कधीच २ फुटाच्या वर गेले नसल्याने आजूबाजूला लोक आहेत आणि कालेजवाले आपल्याला मरू देणार नाहीत हे जाणवल्याने मीसुद्धा पाण्यात धावायचा प्रयत्न केला....आणि साधारण ४.५ ते ५ फुटापर्यंत गेल्यावर  प्रचंड भीती वाटली आणि तोल जायला लागला...म्हंटल आता मी बुडणार...लगेच जवळच असणाऱ्याचा भसकन हात धरला आणि पाणी कमरेखाली आल्यावर गुपचूप कडेला जाऊन उभी राहिले....

माझी हि अवस्था पाहून थोडेसे बेसिक शिकवल्यावर बेल्ट लावायला दिला...मी बुडू नये म्हणून ...तर त्या बेल्टने मला काही पाय खाली ठेवता येईना आणि धड पोहताही येईना...एकदम त्रिशंकू होऊन गेले...दोनतीन वेळा तर ३.५ फुट खोल पाण्यातच गटांगळ्या खाल्ल्या...क्लास संपल्यावर दुसरा एक कोच जो थोड्या वरच्या लेवलला शिकवायचा त्याने काही टिप्स द्यायचा प्रयत्न केला...
" असं श्वास घेऊन खाली जायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा "
मी श्वास घेऊन खाली गेले आणि फुस्कन सगळा श्वास सोडला आणि भसकन पाणी नाका तोंडात...
"घरी बादलीत पाणी घेऊन त्यात सराव कर"
"बरं" असं सांगून केला नाही तो नाहीच... शेवटी विद्यार्थी असण्याचा पुरावा नको का?
आणि काय यड्यासारख बादलीत तोंड घालून बसायचं ...त्यापेक्षा पुलात बुडलेल परवडेल हासुद्धा एक विचार होताच...

सारखंसारखं बुडून वैताग आला शेवटी मी म्हंटल आता या बाईचं ऐकलं पाहिजे...म्हणतीये अंग सैल सोडून श्वास धरून डोक घाल पाण्याखाली तर घालावं....काही मरेपर्यंत बुडू द्यायची नाही...शेवटी तिचेही रेप्युटेशन आहेच नाही का?  थोडा श्वास धरून डोक घातलं पाण्याखाली आणि कसलासा फोमचा बोर्ड धरून पाय मारायला लागले ....काय आश्चर्य २ एक फुट तरी पोहता आले असेल...मग काय महाराजा !!!...भीती झाली ना कमी...मग एकदम जन्मजात कोळीण असल्यासारखं पोहायचा प्रयत्न करायला लागले...डोकं फार काळ पाण्याखाली ठेवायची हिम्मत अजूनही होत नव्हती पण बर्यापैकी बेल्ट न लावता जमायला लागलं...बऱ्याच जणांनी मी इतका मनापासून प्रयत्न करताना पाहून मदत केली, कौतुक केलं...आमच्या पोहायच्या बाईंनी तर दुसरा वर्ग चालू होईपर्यंत सराव करण्याची मुभा दिली...हळू हळू जमायला लागले आणि दोनचार स्ट्रोक सुद्धा जमायला लागले...

आता तर पाण्याची भीती बऱ्यापैकी कमी होऊन थोडफार पोहता येतं...काहीही झाले तरी पाय जमिनीवरच ठेवायचे हे मी लहानपणापासूनच ठरवले असल्याने इथेही उगाच फार खोल मी शिरत नाही आणि पाय जमिनीवर टेकतील इतपर्यंतच जाते...तरी हेही नसे थोडके.

Thursday, July 15, 2010

माझा एक थरारक अनुभव

मुंबईत असतानाकामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला..
खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते...

त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (सेकंडक्लासच्या) डब्यातून एक भरलेली गोणी धडपडली आणि
मग तिच्यावर गोष्टीतल्या उद्रांसार्ख समोरचा काही दिसत नसल्यासारख्या एकावर एक अजून गोण्या येऊन आदळल्या...आम्ही अर्थातच फिदीफिदी हसून घेतले...अजून एकदा मी गाडीत
चढताना अचानक कोणीतरी माझ्या पाठीत मारलं..मग मी संतापून दुसऱ्या एकीच्या पाठीत गुद्दा घातला...तिने पाहिलं आणि अजून मला मारायला धावली आणि मी पण प्रतिकाराच्या
पवित्र्यात उभी राहिले पण गाडी सोडायचा धोका आम्हाला असल्या फालतू कारणासाठी घ्यायचा नसल्याने ते तिथेच थांबलं...

असो, तर काय ? हं..माझा अनुभव ....झालं काय कि मी नेहमीप्रमाणे दादरात उतरायला म्हणून दारात उभी होते...
हि SSSSS गर्दी....तशातच गाडी थांबल्यावर मी उतरून घेतले पण....माझी पर्स कोणीतरी धरून ठेवली....इतर बायका मला धक्काबुक्की करून आत चढल्या आणि उतरल्या...मी आपली दारातच  एक हात दांड्याला धरून उभी...ती बाई काही पर्स सोडायला तयार नाही...तिला वाटलं असेल जीवाच्या भीतीने मी पर्स सोडून देईन...पण त्यात माझे त्यावेळेसचे २-३ हजार रुपये होते शिवाय बस पास ,ट्रेन पास अजून काही चिल्लर गोष्टी...तर मी काही पर्स सोडली नाही आणि तिनेपण ...लोकल चालू झाली ....मी पण एका हाताने दांडा धरून ठेवला आणि पळत पळत दुसऱ्या हाताने त्या बाईच्या हातावर गुद्दे मारायला सुरुवात केली...गाडीने वेग घेतला आणि मी पण...शेवटी तिने पर्स सोडली....

एवढं सगळं गर्दीने गजबजलेल्या दादरातल्या स्टेशनवर....ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना फलाटावर उभे असलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....हा प्रकार
झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले आणि इतरांसाठी काही झालेच नसल्याने तसाही काही वाटण्याचा प्रश्न आला नाही..

तर असा हा माझा एक अनुभव.

Recovery