Saturday, February 25, 2012

Stealing inlaws -- true

I am loosing my mind!! My husband's mother keeps stealing my stuff..yes.. she STEALS my stuff.

First time it happened and I thought I must have misplaced it. But it keeps happening when she is around. The very first time she stole my designer sandals. When she came to my house for delivery (like that's true!!) god knows what she did with my baby's clothes my mother sent with her. I could never find them after coming from hospital.

My money from my purse kept missing, my clothes....I mean seriously...what kind of sicko does these kind of things??? in her own son's house too...

You won't believe but she kept trashing my kitchen items too!!!

When I went to India after 3 yrs...within in few hours I found that something in my purse was out and she and her daughter were laughing at me....WTF???? What kind of mentality is that???

I had my own bath soap like everyone else but she deliberately kept using mine even when I kept it in the bedroom.

This woman her husband and daughter didn't want me in their family so they keep acting shitty...it's not difficult for them of course...I kept showing my husband but he thinks I am lying...

It's nothing but just acting nasty and trying to torture me for no reason...but they don't understand that their son has to pay for the stuff and it's his loss of money not mine....but it won't go into their thick head..

What a nasty ass people!!! YUCK~~

Finally I had to say it out in public. Disgusting!!

Tuesday, January 3, 2012

फुलके

तर सांगायची गोष्ट अशी कि मला फुलके फारसे आवडत नाहीत...जेवणातले हो. पोळी, फुलके, भाकरी, पुरी, पराठे, गाकर यातले फुलके.
मी दहावीनंतरच्या सुटीत एकाच्या घरी जेवायला होते तेव्हा फुलके केले होते...तीच पहिली ओळख. आम्ही लहान असल्याने आधीच वाढून दिलं होतं. गरम भाजी, साधं वरण भात अन हे फुलके अगदी तव्यावरून ताटात असे...मला आधी वाटलं सादळलेला पापडच आहे कि काय. दिवसभर उनाडक्या करून मस्त भूक लागलेली..एक दोन फुलके झाल्यावर "अजून देऊ का गं?" अशी प्रेमाची विचारणा झाली. भूकच लागल्याने "हो " म्हणाले...दोन घासात तो पण फुलका संपला...पुन्हा प्रेमाने विचारल्यावर मीच लाजून "नको " म्हणून वरण भात संपवून तशीच अर्धपोटी झोपायला गेले.

पोळी, भाकरी, पराठे,गाकर खाल्ल्यावर कसं शांत वाटतं. अन्नदाता सुखी भव!! हे न बोलताही समजतं. त्यातही भाकरी अन वांग्याचं भरीत...अहाहा!!! स्वर्गसुख! ते असो.
तेलकट्ट पुऱ्या फक्त बटाट्याच्या भाजीबरोबरच आवडतात. पराठे इथे एका पंजाब्याकडे खाल्ले तेव्हापासूनच आवडायला लागले. घरी एकदोन यशस्वी प्रयत्नहि करून झालेले आहेत. गाकर म्हणजे पोळीच पीठ म्हणजे भिजवलेला गोळा हातावर घेऊन जाडपैकी चपटे करायचे अन भाजायचे. व्यवस्थित जमले तर उत्तम लागतात नाहीतर कच्चे गोळे खावे लागतात..

असो, उगाच आपलं एक सुचलं म्हणून लिहिलं इतकंच.

Sunday, January 1, 2012

New Stuff!!



Currently I am busy making jewelry like earrings, bracelet, necklaces. Also making head pins with decorations for girls. I spoke with a lot of boutique owners and one person is ready to put my stuff in her store, so I am busy making different stuff for Feb. 2012 - Valentine's Day you know!!

I hope I get some sale. 

Friday, November 4, 2011

नटरंग

मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का??
मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले?

अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला. म्हंटल काही हरकत नाही, काय होईल फार फार तर १०० रु. वाया जातील...अगदी नवी कल्पना, मस्त अभिनय ..मला खूप आवडला "वळू". मग हळू हळू बरीच नवीन नावं ऐकू यायला लागली रात्र आरंभ, गाभ्रीचा पाऊस, हल्लीच देऊळ त्यातच एक नाव होते नटरंग. विषय वाचला "तमाशा", आधी वटला काय असणार नवीन ? फार फार तर गाणी आणि सजावट. पण विषय बराच वेगळा आहे. कथा, अभिनय अन गाणी सगळेच अप्रतिम. एकाच उणीव ती म्हणजे गावठी हेल काढून बोलणे, गावठी स्क्रिप्ट लिहिणे तितकेसे जमत नाही.

सुरुवात होते एका पुरस्कार समारंभाने ज्यात गुणा आपले मुख्य पात्र याला जीवनगौरव पुरस्कार मिळतो. हा एक बायका -पोरं अन म्हातारा बाप असलेला सामान्य शेतमजूर ज्याला तमाशाची आवड / नाद असतो. त्याच्या शेतमालकाने नवीन साधनं आणल्याने त्याची मजुरी सुटते. हा गुणा वाग लिहिण्यात हुशार असतो अन त्याला त्याची खूप आवडही असते. त्याच्यासारख्याच मजुरांना घेऊन तो तमाशाचा फड उभा करू लागतो...त्याचा म्हातारा बाप त्याच्या विरोधात असतो..सासरासुद्धा येतो कि " हवं तर मी तुम्हाला नवीन धंदा उघडून देतो पण तमाशा नको"...गुणा त्याच्या निश्चयावर ठाम असतो. धडपड करून एक एक करत सगळे जमत आलेले असते पण तमाशा म्हंटल्यावर बाई हवीच...तीसुद्धा चांगली नाचणारी, दिसणारी अन गाणारीसुद्धा...ते कसं जमायचं? जमवतात कसंतरी...
बरीच धावपळ केल्यावर अन मार खाल्ल्यावर एक तमासगीर मुलगी अन तिची आई तयार होतात पण एका अटीवर "तमाशात नाच्या हवा त्याशिवाय नाचणार नाही". आली का पंचाईत!! इथे सगळे "मर्द" तर नाच्या कोण होणार? सगळं फिसकटतय का काय अशी परिस्थिती येते...शेवटी आपला गुणा तयार होतो.

मुख्य नाचणारी त्याला स्त्रीचे हावभाव, चालणे, बोलणे, मुराकणे शिकवते अन एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. दोन फड लावल्यानंतर लगेच त्यांना सुपाऱ्या मिळायला लागतात...लोकांना फड खूप आवडलेला असतो. इकडे गावातील लोक त्याच्या बायकोला नक्को जीव करून सोडतात...बायका टोमणे मारतात, पुरुष तिचा गैरफायदा घ्यायला बघतात अन लोक त्याच्या मुलाला त्रास देऊ लागतात..काहीबाही बोलू लागतात. खुद्द त्यालासुद्धा त्याच्याच तमाशात नवीन आलेल्या ढोलकीवाल्याकडून अंगचटीला जाणे अन शारीरिक सुखाची मागणी याला सामोरे जावे लागते.

दौर्यावर असताना दोन राजकीय गटांमधील सुंदोपसुन्दीत त्याच्या थेटरला आग लावली जाते अन त्याच्यावर बलात्कार होतो. सगळं उन्मळून पडल्यावर तो घराकडे जातो तर घर बंद असते...बायको मुलांसाठी सासरी जातो तर त्याची छी थू करून हाकलला जातो...अगदी त्याच्या मुलाकडूनसुद्धा. आता त्यांना तरी कसा दोष देणार? परत आल्यावर कोणताही साथीदार नवीन सुरुवात करायला तयार होत नाही, एक सोडून ..त्याची नर्तकी. ती त्याची साथ देते अन शेवटी जीवनगौरवपुरस्कारापाशी येऊन सिनेमा थांबतो.

Sunday, October 23, 2011

हे ssssss इथं

आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे".
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही....बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक "हे इथच " असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला....तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने "कुठं ?" विचारल्यावर ह्याने "हे ssss इथं " सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं...

अजून एक किस्सा आठवला...पुण्यातला..
मी पुणे university त एका कामासाठी गेले होते आणि हवा तो विभाग कुठे आहे ते माहिती नसल्याने म्हंटल जरा विचारून सापडेल...तर एका इमारतीत गेले आणि एका प्यूनला विचारला...त्याने हि पुढची इमारत असं सांगितल्यावर "त्या पुढच्या " इमारतीत गेले आणि पार अगदी तिसऱ्या मजल्यावर जाऊनसुद्धा कोणी कुत्रासुद्धा, माफ करा कुत्रे तिथं बरेच होते तेव्हा कोणीच माणूस सापडेना..म्हणून तसेच फिरत फिरत हि नाही ती असेल करीत आजूबाजूच्या इमारतीत गेले...त्यातल्याच एका ऑफिसातल्या बाईंनी एका इमारतीत जा सांगितले आणि कसं जायचं (म्हणजे इथून उजवीकडे मग डावीकडे )ते सांगितलं....मग तसं गेले...तर तिसऱ्याच ठिकाणी...शेवटी वैतागून म्हंटल एखाद्या विद्यार्थ्याला नाहीतर रस्त्यावरच्या कोणालातरी विचारावं आणि एक महाशय जे शिक्षक असू शकतात हि शंका आली त्यांना विचारलं...त्यांनी काही प्रश्न विचारून मला हवा तो विभाग कोणता आणि इथे कसं जायचं ते सांगितलं....इथे गेले...

जरा आत गेल्यावर लक्षात आलं कि पहिल्यांदा ज्या ठिकाणी (जिथून प्युनने "हि पुढची" सांगितलं ) तिथंच स्वारी परत आलेली. इतका संताप आला आणि मग हसू आलं. त्या प्युनला झापावं तर तो मेला कुठं दिसेना. तो विभाग तळात होता. मग तिथल्या एका ऑफिसात जाऊन एका तरुण प्रोफेसरला भेटले आणि काम सांगितलं. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अजून एका ठिकाणी जायला सांगितलं. मी पत्ता विचारला तर इमारतीचं नाव देऊन महाशय म्हंटले कि "हि इथेच ए". मग मात्र राहवलं नाही..." अहो काय लावलंय? इथ यायच्या आधी याच ठिकाणच्या एका प्युनने ती पुढची बिल्डींग म्हणून इथून पाठवलं. प्रत्येकजण हि इथंच ए करत होते आणि याच इमारतीभोवती गेला दीड एक तास तरी मी गोल गोल फिरतेय...जरा नीट सापडेल असं पत्ता सांगायला काय होतंय? " असं वसकले.

असो,
पण एकंदरीत एखाद्याला आपला पत्ता सांगायचा नसेल किंवा घरी सहजासहजी किंवा अगदीच घरी येऊ द्यायचं नसेल तर बिनदिक्कत सांगावे "अरे त्यात काय मी हे sssssss इथच तर राहते/तो " ,
त्याने शंका काढली कि "कसं यायचं?" तर जसं काही आपण अमिताभ बच्चनसारखे अगदी प्रसिद्ध आहोत असं भासवून
"अमुक अमुक स्टेशनावर ये आणि खाली उतरून कोणालाही विचार" किंवा " अमुक अमुक बस स्टॉपवर उतर आणि कोणालाही विचार ",


आणि जर आपल्याला कोणी अशा पद्धतीचा पत्ता सांगितला तर समजावे की कोणालाच तो माणूस किंवा पत्ता माहिती नाही...अन आपली भरपूर पायपीट होणार आहे....इतके करूनही नशीब जोरावर असेल तरच पत्ता सापडेल ...त्यामुळे असा कोणी पत्ता सांगत असेल तर त्यांनाच घरी बोलवावे आणि म्हणावे "एक फोन टाक, मी स्टेशनावर घ्यायला येते/तो" आणि एकदम घाई असल्याचे किंवा बस आल्याचे किंवा अचानक कोणीतरी ओळखीचे पण खूप काळ न भेटलेले दिसले असे करावे आणि जरी आपल्याकडे त्या ह्या ओरिजिनल वेळखाऊचा फोन नंबर नसला तरी " मी तुला फोन करतो/ते, आता खूप घाईत आहे " वगैरे सांगून पळावे.


Saturday, October 15, 2011

Purpose

I don't know what the fukin' purpose of my life is!!! So damn difficult. 

Honestly, I love my child but she is not gonna need me when she grows up. Then what? May be learning new stuff, singing, dancing, going places...may be the world trip. Not the traditional like going to place to take a picture and move on but to stay and enjoy and what not...but then what?  What have I changed? Who the hell needs me? If they do, why? Did I make their life happy? Made any difference?  

Sometimes, I look in the mirror and can't figure out who that is? What's the relation? Do I know her? What is happening? 

 What kind of life is that which doesn't make any difference!! In a good way. What is good way anyways? Who decided what's good and what's bad? If that's fair then why the hell people who make other people's life miserable are not punished? 

I don't know anymore. Feels like I am wasting my life here. So I am giving my time to help at school. I am so tired...physically, mentally ..don't feel like talking to anyone for no reason. I use to feel happy even when the time was harsh...not just harsh but fucked up..now it's all fine...Then why the hell do I feel this crappy? Not sure what I wanna do and even if I do that I will be happy.




Wednesday, February 9, 2011

बोबडी

सगळे तिला बोबडीच म्हणायचे....अर्थात तिच्या समोर नाही...
मी तिला पहिल्यांदा कधी पहिले ते आठवत नाही... मी साधारण ४-६ वर्षाची असताना आज्जी मला मुंबईला घेऊन जायची, तेव्हा असेल कदाचित...ती आजीची मैत्रीणच होती म्हणा ना!! आईच्या म्हणण्यानुसार ती माझ्या पणजीला कुठे पीठ आणून दे, कुठे किराणा आणून दे वगैरे फुटकळ कामे करी...
साधारण आजीच्याच वयाची असेल...नेहमी घरी यायची...घर म्हणजे तरी काय...फक्त एक छोटी खोली...तीच बेडरूम, लिविंग रूम, किचन...चाळीतल्या खोल्या अजून कशा असायच्यात!! 

गिरगावात राहायचो आम्ही त्यावेळेस...नेमकी चहाची वेळ साधून बोबडी नेहमी घरी यायची......त्यावेळेस आमचीच पंचाईत असायची...मग तिला चहाचा एक कप दिला जायचा...कदाचित तेव्हढ्यासाठी ती "ती " वेळ साधून येत असावी...मग आम्ही हळूच बिस्कीट कपात टाकायचो...तिला दिसू नये म्हणून...मग तसाच चहा प्यायचा....

एकदा काही कारणाने मी तिच्या घरी गेले...घरी एक जाऊ होती जी ऑर्डरनुसार चकल्या, लाडू वगैरे वगैरे बनवायची....हाताला खूप चव होती तिच्या...बर्यापाकी ऑर्डरी मिळायच्या...घर चालवायची....त्या उलट बोबडी...उपजीविकेची साधन म्हणजे नवरा...तो काय करायचा काय माहित....तिचे घरसुद्धा आमच्यासारखेच....अजून कसे असायचेय!!! तिच्या घरी अर्थातच तिच्या मताला काही किंमत नाही...मला फार वाईट वाटायचे...पण काय करणार? जगाचा नियम...

मी गावातून मुंबईत आले तेव्हा माझ्यासाठी शाळा शोधणे चालू होते....आमच्या घरमालकांनी आम्ही अगदीच दरिद्री आहोत असे वाटून मुन्सिपाल्तीची शाळा सुचवली, पण बोबडीने डी.जी.टी. शाळेबद्दल सांगितले आणि मी बर्यापिकी शाळेत गेले...मध्यमवर्गीयांची शाळा...चांगली होती..अजूनही आहे, पण कशी ते माहिती नाही..

काही काळाने आम्ही ते घर सोडून उपनगरात आलो...बोबडीचा विसर पडला...अशातच ती एकदा आली...दार उघडल्याबरोबर माझ्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली...लगेच संशय आला कि काहीतरी ठीक नाही...आणि तिने सांगितलेच...वाईट वाटले...आता जावेच्याच जीवेवर जगणे आले..ती काही खूप वाईट होती अश्यातला भाग नाही, पण तरीही...

कसे असते ना आयुष्य? आता कदाचित नसेलही ती...सॉरी..त्या आजी...